रविवार, १९ सप्टेंबर, २०१०

तुकयाची ग्वाही 8

तुक्याची ग्वाही-८
"जैसी कारंज्याची कळा । तो जिव्हाळा स्वहिताचा ॥" ( ८०१,जोग प्रत)
तुकाराम महाराजांच्या काळातही कारंजी होती हे ह्या उपमेवरून कळल्यावर मोठी गंमत वाटते. त्यातही कारंज्याचे रहस्य त्यांनी सांगून स्वहिताचा उपदेश द्यावा ह्याचे कौतुक करावे तेव्हढे थोडेच आहे. कारंज्यात धारा एकापेक्षा एक उंच उडाव्यात अशी योजना करायची असेल तर पाण्याला दाब असावा लागतो. ह्या तांत्रिक बाबीचा दृष्टांत तुकाराम महाराज असा देतात की कारंजाची शोभा वाढवायची असेल तर जसा पाण्यावर दाब असावा लागतो तसेच स्वहिताचे कारंजे थुइथुई उडायचे असेल तर त्यावर "जिव्हाळा" ह्या गोष्टीचा दाब, रेटा असणे आवश्यक आहे. स्वहित साधण्यास अंत:करणात प्रेमाचा जिव्हाळा पाहिजे. ह्या अभंगात पुढे तुकाराम महाराज अशी हमी देतात की भूतमात्रांना शांती साठी प्रेमाचा जिव्हाळा हवा हे मी खुद्द मोजलेले आहे. हीच "तुक्याची ग्वाही" समजायला हरकत नाही !

अरूण अनंत भालेराव
भ्र:९३२४६८२७९२ ( arunbhalerao67@gmail.com)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा