मरण पाषाण
पूर्वी समाधी घेत, त्याचे
वर्णन साधारण असे असायचे की एक बेसमेंट आहे; त्याला वर येण्याची वाट आहे; व वर एक
आडवे दार आहे व समाधी घेणारा आतून त्या दारावर एक भला मोठा दगड ठेवतो. हळू हळू बेसमेंट
मधली हवा श्वासागणिक कमी कमी होत जाते व श्वास बंद होत माणसाचा प्राण जातो. स्वतः
घ्यायची ती हीच समाधी. आपसुक मरण यायच्या आधी आणलेले मरण. मरणाचे मरण.
हे दृश्य बघताना दगड व
त्याचे आतून सरकवणे हे मोठे नाट्यमय दिसते. त्याला दगडाच्या सरकण्याचा आवाज
पार्श्वसंगीत म्हणून दिला तर ते फारच प्रभावी दृश्य. हा दगड कशाचे प्रतीक आहे ? तर
तुकाराम महाराज इथे हा दगड ज्ञानाचे प्रतीक आहे असे सांगत आहेत. कसले ज्ञान ? तर
सुख दु:खे, हे भोग, हे देहाला होत आहेत व मी ह्या देहापासून वेगळा आहे हे ज्ञान.
अशा यथार्थ ज्ञानाचा दगड आम्ही भोगावर टाकून दिला आणि देहादिकाला येणार्या मरणाला
ह्याच यथार्थ ज्ञानाने मारले.
अद्वैत तत्वात जर देव
सर्व व्यापून आहे तर मी वेगळा कुठे आहे ? आणि मग कशाची प्राप्ती करण्यासाठी मी
अंगात बळ आणू ?
जर अंतरबाह्य केवळ तूच भरलेला
आहेस तर आतून बाहेर काय काढू व बाहेरून आत काय आणू ?
कितीही वाद केला तरी तो
कोरडाच राहतो. देहादिक प्रपंच हे मग स्वप्नवत वाटतात व त्याची पीड़ा कोणी घ्यावी ?
जगातले सगळे वाण सामान
तुमच्या घरी आलेले आहेत. तुम्ही फक्त मजूराची रोख मजूरी द्यायची आहे.
मला काही लाभ किंवा हानी
असे काही नाहीय. जो कोणी ह्या देहाचा धनी असेल तो आमच्या देहरुपी वाड्याचे रक्षण
करील !
देवाक् काळजी !
--------------------
भोगावरी आम्ही घातला पाषाण । मरणा मरण
आणियेलें ॥1॥
विश्व तूं व्यापक काय मी
निराळा । काशासाठीं बळा येऊं आतां ॥ध्रु.॥
काय सारूनियां काढावें
बाहेरी । आणूनि भीतरी काय ठेवूं ॥2॥
केला तरी उरे वाद चि
कोरडा । बळें घ्यावी पीडा स्वपनींची हे ॥3॥
अवघेचि वाण आले तुम्हां घरा । मजूरी मजुरा रोजकीर्दी ॥4॥
तुका म्हणे कांहीं नेणें
लाभ हानी । असेल तो धनी राखो वाडा ||५||
-----------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा