ढेंकणाचे संगे, अमेरिकन डायमंड, भंगले !
तुकाराम महाराज म्हणाले होते, ढेंकणाचे संगे हिरा जो भंगला !
कोणी ह्याची शहानिशा करायला धजत नाही. कारण न जाणो, खरेच जर हिरा ढेंकणाजवळ ठेवल्याने भंगला तर त्याचे पैसे भरावे लागतील. पण खर्या हिर्यापेक्षा, अमेरिकन डायमंड बरेच स्वस्त असतात. आता त्यावर पडताळा करून पहायला हरकत नव्हती. पण, इतके दिवस हे पडताळणे अवघड होते. कारण अमेरिकेत, अमेरिकन डायमंड आहेत, पण ढेंकूण नसायचे. पण आता अमेरिकेत, न्यू यॉर्कला, नुकत्याच आलेल्या बातमीवरून भरपूर ढेंकूण झाले आहेत.
ढेंकणाचे संगें हिरा जो भंगला । कुसंगें नाडला तैसा साधु ॥१॥ओढाळाच्या संगें सात्विक नासलीं । क्षण एक नाडलीं समागमें ॥ध्रु.॥डांकाचे संगती सोनें हीन जालें । मोल तें तुटलें लक्ष कोडी ॥२॥विषानें पक्वान्नें गोड कडू जालीं । कुसंगानें केली तैसी परी ॥३॥
भावें तुका म्हणे सत्संग हा बरा । कुसंग हा फेरा चौर्याशीचा ॥४॥
ह्या मूळ अभंगाचे अमेरिकेला आता चांगलेच प्रत्यय येत आहेत. भारतीय, कोरियन, चिनी, मेक्सिकन वगैरे लोक प्रचंड प्रमाणात गेल्या कित्येक वर्षांपासून स्थलांतरित होत आहेत. इतके की आता तिथे मॉल्स मध्ये मूळचे गोरे लोक फारच कमी दिसतात व काळे, मेक्सिकन, भारतीय, चिनी हेच लोक ज्यास्त दिसतात. आता राहणीमानाच्या दृष्टीने तुलना केली तर आपला त्यांना "कुसंग"च वाटणे साहजिक आहे. पचापच थुंकणे काय, नाकात बोटे घालणे काय, शरीराला दुर्गंधी येणे काय, दात खराब असणे काय, शिवाय एक ना अनेक व्याधी. तरी बरे पूर्वीचे खरूज, नायटे, सर्दीपडसे, खोकला वगैरे आजकाल नाहीयत. आता ह्या कुसंगाचा त्यांना प्रत्यक्ष फटका दिसतोय तो ढेंकणाच्या अमेरिकेत येण्याने.
आताच्या अमेरिकेला जाणार्यांना कल्पना नाही, पण पूर्वी ( ३० वर्षांपूर्वी ), अमेरिकेला जायच्या आधी एक पी फॉर्म भरून द्यावा लागायचा. त्यात सरकारी डॉक्टरांकडून तपासून घ्यावे लागे की तुम्हाला कॉलरा, पीतज्वर, टी.बी. वगैरे रोग नाहीत. आता कस्टम्सना नवीन यंत्रे बसवावी लागतील, सामानात, अंगावर, ढेकूण आहेत की नाही ते बघायला. हाच तो कुसंगाचा फेरा असावा !
अरुण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com

सोमवार, २५ ऑक्टोबर, २०१०
सोमवार, ११ ऑक्टोबर, २०१०
तुकयाची ग्वाही 12
तुक्याची ग्वाही-१२
"मुंगिचिया घरा कोण जाय मूळ । देखोनिया गूळ धाव घाली ॥" ( १६२०, जोग प्रत)
ज्याला आपल्या स्वहिताची चाड, काळजी आहे त्याने आपण होऊन हरीकथेवर लक्ष द्यावे असे म्हणत असताना इथे तुकाराम महाराज व्यवहारातला दाखला देत आहेत तो असा की मुंगीला गूळ आवडतो तर ती आपण होऊन गुळाकडे धाव घेते, कोणी आमंत्रण ( मूळ पाठवणे) देण्याची वाट पहात नाही. तसेच जो दाता आहे त्याला देण्यात आनंद आहे तर त्याने कोणी याचना करण्या आधीच आपण होऊन दान द्यावे. अन्न व पाणी आपल्याला निमंत्रण देण्याअगोदरच आपण ते गिळंकृत करतो. ज्याला काही व्याधी, रोग झाला आहे तो आपण होऊनच वैद्याकडे धाव घेतो. असेच आपले हित हवे असेल तर आपण होऊन आपण हरीकथेकडे धाव घ्यायला हवी. आपल्या हिताचा कळवळा आपल्यालाच सहजतेने यायला हवा तरच तो परिणामकारक होईल, दुसर्याने सांगून करून काही उपयोग होत नाही असा हा रोकडा उपदेश आहे.
अरुण अनंत भालेराव
भ्र: ९३२४६८२७९२ arunbhalerao67@gmail.com
"मुंगिचिया घरा कोण जाय मूळ । देखोनिया गूळ धाव घाली ॥" ( १६२०, जोग प्रत)
ज्याला आपल्या स्वहिताची चाड, काळजी आहे त्याने आपण होऊन हरीकथेवर लक्ष द्यावे असे म्हणत असताना इथे तुकाराम महाराज व्यवहारातला दाखला देत आहेत तो असा की मुंगीला गूळ आवडतो तर ती आपण होऊन गुळाकडे धाव घेते, कोणी आमंत्रण ( मूळ पाठवणे) देण्याची वाट पहात नाही. तसेच जो दाता आहे त्याला देण्यात आनंद आहे तर त्याने कोणी याचना करण्या आधीच आपण होऊन दान द्यावे. अन्न व पाणी आपल्याला निमंत्रण देण्याअगोदरच आपण ते गिळंकृत करतो. ज्याला काही व्याधी, रोग झाला आहे तो आपण होऊनच वैद्याकडे धाव घेतो. असेच आपले हित हवे असेल तर आपण होऊन आपण हरीकथेकडे धाव घ्यायला हवी. आपल्या हिताचा कळवळा आपल्यालाच सहजतेने यायला हवा तरच तो परिणामकारक होईल, दुसर्याने सांगून करून काही उपयोग होत नाही असा हा रोकडा उपदेश आहे.
अरुण अनंत भालेराव
भ्र: ९३२४६८२७९२ arunbhalerao67@gmail.com
सोमवार, ४ ऑक्टोबर, २०१०
तुकयाची ग्वाही 11
तुक्याची ग्वाही-११
"डोळ्यामध्ये जैसे कणु । अणु तेंहि न साहे ॥ तैसे शुद्ध राखा हित । नका चित्त बाटवू ॥" ( १५७७, जोग प्रत )
आपल्या बाळाचा जसा कळवळा असतो तसा स्वहिताचा कळवळा राखावा असे इथे तुकाराम महाराज सांगत आहेत. एक छोटासा कण जरी डोळ्यात गेला तरी तो जसा डोळ्याला खुपतो, सहन होत नाही, तसेच इतर अनेक वासनांना दूर सारून फक्त स्वहिताचाच विचार करावा. इतर वासना चित्ताला जणु बाटवतात, तर त्या डोळ्यातल्या शल्यागत समजून त्या दूर साराव्यात. कुठलाही विचार दीर्घ पल्ल्याचा करायचा असेल तर तो सार रूप करून त्याचा प्रसार करतात तसे आपल्या स्वहिताचे करावे. इथे बीज रूपात साठवण करणे ही बाब फार मोलाचे दर्शन देणारी आहे. धान्याचे बीज चारशे पाचशे वर्षे टिकवलेले आपण जुन्या इजिप्शियन ममीच्या शेजारी सापडलेल्या बीजांवरून जाणतो, तसेच स्वहित हे माणसाने मूळ बीज समजावे.
अरुण अनंत भालेराव
भ्र: ९३२४६८२७९२ arunbhalerao67@gmail.com
"डोळ्यामध्ये जैसे कणु । अणु तेंहि न साहे ॥ तैसे शुद्ध राखा हित । नका चित्त बाटवू ॥" ( १५७७, जोग प्रत )
आपल्या बाळाचा जसा कळवळा असतो तसा स्वहिताचा कळवळा राखावा असे इथे तुकाराम महाराज सांगत आहेत. एक छोटासा कण जरी डोळ्यात गेला तरी तो जसा डोळ्याला खुपतो, सहन होत नाही, तसेच इतर अनेक वासनांना दूर सारून फक्त स्वहिताचाच विचार करावा. इतर वासना चित्ताला जणु बाटवतात, तर त्या डोळ्यातल्या शल्यागत समजून त्या दूर साराव्यात. कुठलाही विचार दीर्घ पल्ल्याचा करायचा असेल तर तो सार रूप करून त्याचा प्रसार करतात तसे आपल्या स्वहिताचे करावे. इथे बीज रूपात साठवण करणे ही बाब फार मोलाचे दर्शन देणारी आहे. धान्याचे बीज चारशे पाचशे वर्षे टिकवलेले आपण जुन्या इजिप्शियन ममीच्या शेजारी सापडलेल्या बीजांवरून जाणतो, तसेच स्वहित हे माणसाने मूळ बीज समजावे.
अरुण अनंत भालेराव
भ्र: ९३२४६८२७९२ arunbhalerao67@gmail.com
रविवार, २६ सप्टेंबर, २०१०
तुकयाची ग्वाही 10
तुक्याची ग्वाही-१०
"अनुभवावाचून । सोंग संपादणे । नव्हे हे करणे । स्वहिताचे ॥" ( २५०१,जोग प्रत)
पूर्वी बहुरूपी नावाचे सोंग घेऊन मनोरंजन करणारे, खेळ करणारे लोक असत. अशा एखाद्या बहुरूप्याने देवाचे सोंग आणले पण तसा भाव, अनुभव घेतला नाही, तर त्याचे ते देवपण वाया जाणारे असते. दगडाच्या देवाला मनोभावे भजणारे भक्त तरून जातील, पण दगडाला मात्र दगड म्हणूनच रहावे लागते. धोत्र्याच्या झाडाला ( कनक ) आपण जरी सोन्याचे ( कनक ) झाड म्हणून मानले तरी ते काही सोन्याचे मोल पावणार नाही. संत तुकाराम महाराजांचे मोठेपण असे आहे की त्यांचे उपदेश व विचार सार्वत्रिक व वैश्विक असे ठरतात. कारण असाच उपदेश एके ठिकाणी शेक्सपीयरनेही दिलेला आहे. तो म्हणतो की जे चमकते ते सर्वच काही सोने नसते. व्यवहारात तर हा उपदेश फारच महत्वाचा आहे. आपण जर शेजार्याशी तुलना करीत त्याच्याच सारखे श्रीमंतीचे सोंग आणले, पण तसा खरा अनुभव नसेल तर आपली किती तारांबळ उडते ते प्रत्येकालाच माहीत आहे. असेच राजकारण्यांचे होते. ते आव भले आणतात, जनसेवेचा पण त्यांची अमाप संपत्ती पाहिली की लोकांना खरा अनुभव येतो. सर्व काळी खरे ठरणारे वचन हे असे असते.
अरुण अनंत भालेराव
भ्र: ९३२४६८२७९२
arunbhalerao67@gmail.com
"अनुभवावाचून । सोंग संपादणे । नव्हे हे करणे । स्वहिताचे ॥" ( २५०१,जोग प्रत)
पूर्वी बहुरूपी नावाचे सोंग घेऊन मनोरंजन करणारे, खेळ करणारे लोक असत. अशा एखाद्या बहुरूप्याने देवाचे सोंग आणले पण तसा भाव, अनुभव घेतला नाही, तर त्याचे ते देवपण वाया जाणारे असते. दगडाच्या देवाला मनोभावे भजणारे भक्त तरून जातील, पण दगडाला मात्र दगड म्हणूनच रहावे लागते. धोत्र्याच्या झाडाला ( कनक ) आपण जरी सोन्याचे ( कनक ) झाड म्हणून मानले तरी ते काही सोन्याचे मोल पावणार नाही. संत तुकाराम महाराजांचे मोठेपण असे आहे की त्यांचे उपदेश व विचार सार्वत्रिक व वैश्विक असे ठरतात. कारण असाच उपदेश एके ठिकाणी शेक्सपीयरनेही दिलेला आहे. तो म्हणतो की जे चमकते ते सर्वच काही सोने नसते. व्यवहारात तर हा उपदेश फारच महत्वाचा आहे. आपण जर शेजार्याशी तुलना करीत त्याच्याच सारखे श्रीमंतीचे सोंग आणले, पण तसा खरा अनुभव नसेल तर आपली किती तारांबळ उडते ते प्रत्येकालाच माहीत आहे. असेच राजकारण्यांचे होते. ते आव भले आणतात, जनसेवेचा पण त्यांची अमाप संपत्ती पाहिली की लोकांना खरा अनुभव येतो. सर्व काळी खरे ठरणारे वचन हे असे असते.
अरुण अनंत भालेराव
भ्र: ९३२४६८२७९२
arunbhalerao67@gmail.com
मंगळवार, २१ सप्टेंबर, २०१०
तुकयाची ग्वाही 9
तुक्याची ग्वाही--९
"आपुल्या हिताचे । न होती सायास । गृहदारा आस । धनवित्त ॥"(६३२,जोग प्रत)
बुद्धीचा पालट धरा रे कांही, मागुता हा नाही, मनुष्यदेह, अशी विनवणी करणारे तुकाराम महाराज, अध्यात्मातले तत्व सांगतात की जन्म मृत्यू ह्या उपाध्या माणसाने का भोगत रहाव्यात ? फारा पुण्यानंतर मिळणारा मनुष्यदेह मिळाल्यावर चांगले काम करणे हेच आपल्या हिताचे आहे. आपल्या जे हिताचे आहे ते करण्यात काही सायास होत नाहीत हे सोपे तत्व तसे पटण्यासारखे आहे. आणि सगळ्या घरादाराची, धनाची आस असणे हेही साहजिकच आहे. म्हणून हा मनुष्य देह लाभल्यावर भगवंताचे स्मरण ठेवणे हेच आपल्या हिताचे आहे, कारण त्याने पुढच्या गर्भवासापासून सुटका मिळणार आहे. खरोखर ज्या संबंधामध्ये आपले हित आहे अशा संबंधाची खटपट आपल्या हातून व्हायला हवी. ही खटपट न झाली तर मग मात्र मुद्दाम कराव्या लागणार्या सायासा सारखे अवघड जाणार आहे. इथेही स्वहिताची जपणुक करणे हाच व्यवहारी मार्ग तुकाराम महाराज सुचवत आहेत.
अरुण अनंत भालेराव
भ्र: ९३२४६८२७९२ arunbhalerao67@gmail.com
"आपुल्या हिताचे । न होती सायास । गृहदारा आस । धनवित्त ॥"(६३२,जोग प्रत)
बुद्धीचा पालट धरा रे कांही, मागुता हा नाही, मनुष्यदेह, अशी विनवणी करणारे तुकाराम महाराज, अध्यात्मातले तत्व सांगतात की जन्म मृत्यू ह्या उपाध्या माणसाने का भोगत रहाव्यात ? फारा पुण्यानंतर मिळणारा मनुष्यदेह मिळाल्यावर चांगले काम करणे हेच आपल्या हिताचे आहे. आपल्या जे हिताचे आहे ते करण्यात काही सायास होत नाहीत हे सोपे तत्व तसे पटण्यासारखे आहे. आणि सगळ्या घरादाराची, धनाची आस असणे हेही साहजिकच आहे. म्हणून हा मनुष्य देह लाभल्यावर भगवंताचे स्मरण ठेवणे हेच आपल्या हिताचे आहे, कारण त्याने पुढच्या गर्भवासापासून सुटका मिळणार आहे. खरोखर ज्या संबंधामध्ये आपले हित आहे अशा संबंधाची खटपट आपल्या हातून व्हायला हवी. ही खटपट न झाली तर मग मात्र मुद्दाम कराव्या लागणार्या सायासा सारखे अवघड जाणार आहे. इथेही स्वहिताची जपणुक करणे हाच व्यवहारी मार्ग तुकाराम महाराज सुचवत आहेत.
अरुण अनंत भालेराव
भ्र: ९३२४६८२७९२ arunbhalerao67@gmail.com
रविवार, १९ सप्टेंबर, २०१०
तुकयाची ग्वाही 8
तुक्याची ग्वाही-८
"जैसी कारंज्याची कळा । तो जिव्हाळा स्वहिताचा ॥" ( ८०१,जोग प्रत)
तुकाराम महाराजांच्या काळातही कारंजी होती हे ह्या उपमेवरून कळल्यावर मोठी गंमत वाटते. त्यातही कारंज्याचे रहस्य त्यांनी सांगून स्वहिताचा उपदेश द्यावा ह्याचे कौतुक करावे तेव्हढे थोडेच आहे. कारंज्यात धारा एकापेक्षा एक उंच उडाव्यात अशी योजना करायची असेल तर पाण्याला दाब असावा लागतो. ह्या तांत्रिक बाबीचा दृष्टांत तुकाराम महाराज असा देतात की कारंजाची शोभा वाढवायची असेल तर जसा पाण्यावर दाब असावा लागतो तसेच स्वहिताचे कारंजे थुइथुई उडायचे असेल तर त्यावर "जिव्हाळा" ह्या गोष्टीचा दाब, रेटा असणे आवश्यक आहे. स्वहित साधण्यास अंत:करणात प्रेमाचा जिव्हाळा पाहिजे. ह्या अभंगात पुढे तुकाराम महाराज अशी हमी देतात की भूतमात्रांना शांती साठी प्रेमाचा जिव्हाळा हवा हे मी खुद्द मोजलेले आहे. हीच "तुक्याची ग्वाही" समजायला हरकत नाही !
अरूण अनंत भालेराव
भ्र:९३२४६८२७९२ ( arunbhalerao67@gmail.com)
"जैसी कारंज्याची कळा । तो जिव्हाळा स्वहिताचा ॥" ( ८०१,जोग प्रत)
तुकाराम महाराजांच्या काळातही कारंजी होती हे ह्या उपमेवरून कळल्यावर मोठी गंमत वाटते. त्यातही कारंज्याचे रहस्य त्यांनी सांगून स्वहिताचा उपदेश द्यावा ह्याचे कौतुक करावे तेव्हढे थोडेच आहे. कारंज्यात धारा एकापेक्षा एक उंच उडाव्यात अशी योजना करायची असेल तर पाण्याला दाब असावा लागतो. ह्या तांत्रिक बाबीचा दृष्टांत तुकाराम महाराज असा देतात की कारंजाची शोभा वाढवायची असेल तर जसा पाण्यावर दाब असावा लागतो तसेच स्वहिताचे कारंजे थुइथुई उडायचे असेल तर त्यावर "जिव्हाळा" ह्या गोष्टीचा दाब, रेटा असणे आवश्यक आहे. स्वहित साधण्यास अंत:करणात प्रेमाचा जिव्हाळा पाहिजे. ह्या अभंगात पुढे तुकाराम महाराज अशी हमी देतात की भूतमात्रांना शांती साठी प्रेमाचा जिव्हाळा हवा हे मी खुद्द मोजलेले आहे. हीच "तुक्याची ग्वाही" समजायला हरकत नाही !
अरूण अनंत भालेराव
भ्र:९३२४६८२७९२ ( arunbhalerao67@gmail.com)
बुधवार, १ सप्टेंबर, २०१०
तुकयाची ग्वाही 7
तुक्याची ग्वाही-७
"तुका म्हणे नीत । न विचारितां नव्हे हित ॥" ( १४४६,जोत प्रत)
तुकाराम महाराज हिताचा, स्वहिताचा विचार करा असा उपदेश देतात तेव्हा हित कशात पहावे त्याचाही फार मोलाचा विचार देतात. ते म्हणतात, ज्या विचारात नीतीचा विचार होतो त्यातच हित असते. नीती म्हणजे अगदी सोप्या शब्दात, चांगले काय व वाईट काय ह्याची जाण. आणि हे कसे ठरवायचे तर, आपल्या चित्ताला साक्षी ठेवून. ह्यासाठी ते अगदी रोचच्या व्यवहारातली उदाहरणे देतात. जसे, दळण दळण्या आधी आपण खडे निवडतो, नाही तर भाकरीत कचकच लागेल. इथे आळस करून काही उपयोग नाही. शेत कामात पीक चांगले यायचे असेल तर आजूबाजूचे तण उपटून काढावे लागतात. इथे आपण जसा हिताचा विचार करून, आळस न धरता, काय चांगले त्या नीतीचा विचार करतो व त्याप्रमाणे वागतो, त्यातच माणूस मात्रांचे हित आहे. जीवनाचे सूत्र इतक्या सोप्या पद्धतीने सांगता येणे हे तुकाराम महाराजांचे खासे देखणे वैशिष्टय आहे.
अरूण अनंत भालेराव
भ्र:९३२४६८२७९२ ( arunbhalerao67@gmail.com)
"तुका म्हणे नीत । न विचारितां नव्हे हित ॥" ( १४४६,जोत प्रत)
तुकाराम महाराज हिताचा, स्वहिताचा विचार करा असा उपदेश देतात तेव्हा हित कशात पहावे त्याचाही फार मोलाचा विचार देतात. ते म्हणतात, ज्या विचारात नीतीचा विचार होतो त्यातच हित असते. नीती म्हणजे अगदी सोप्या शब्दात, चांगले काय व वाईट काय ह्याची जाण. आणि हे कसे ठरवायचे तर, आपल्या चित्ताला साक्षी ठेवून. ह्यासाठी ते अगदी रोचच्या व्यवहारातली उदाहरणे देतात. जसे, दळण दळण्या आधी आपण खडे निवडतो, नाही तर भाकरीत कचकच लागेल. इथे आळस करून काही उपयोग नाही. शेत कामात पीक चांगले यायचे असेल तर आजूबाजूचे तण उपटून काढावे लागतात. इथे आपण जसा हिताचा विचार करून, आळस न धरता, काय चांगले त्या नीतीचा विचार करतो व त्याप्रमाणे वागतो, त्यातच माणूस मात्रांचे हित आहे. जीवनाचे सूत्र इतक्या सोप्या पद्धतीने सांगता येणे हे तुकाराम महाराजांचे खासे देखणे वैशिष्टय आहे.
अरूण अनंत भालेराव
भ्र:९३२४६८२७९२ ( arunbhalerao67@gmail.com)
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)