सोमवार, २४ सप्टेंबर, २०१८

तुकाराम टाइम्स
------------- 
तुकाराम महाराजांचा आजचा आग्रह लेख : ५६
----------------
तुकाराम महाराज आज एखाद्या वर्तमानपत्राचे सम्पादक असते तर सम्पादक जसे अग्रलेख लिहून महत्वाच्या बातमीवर टिप्पणी करतात तसे आजच्या बातमीवर काय म्हणाले असते ?
आजची बातमी: ( ५६ )---- मुम्बई तापाने फणफणली ! डेंग्यूची साथ!
-------------
जेवीं नवज्वरें तापलें शरीर । लागे तया क्षीर विषातुल्य ॥1॥
तेवीं परमार्थ जीहीं दुराविला । तयालागीं झाला सन्निपात ॥ध्रु.॥
कामिनी जयाच्या जाहाली नेत्रासी । देखी तो चंद्रासी पीतवर्ण ॥2॥
तुका म्हणे  मद्यपानाची आवडी । न रुचे त्या गोडी नवनीताची ॥3॥
------------
तसा डेंग्यू हा तापाचा प्रकार सध्याचा पण तुकरामाच्या काळातही हा ताप असणारच. त्यावर मग तुकाराम महाराज काय म्हणाले असतील ? ज्यांना डेंग्यू होतो त्यांना माहितच असेल की हा ताप आल्यावर काही गोड लागत नाही. तेच तुकाराम महाराज इथे म्हणत आहेत की त्याला दूध गोड न लागता विषासारखे लागते. हे म्हणजे ज्याला कावीळ झाली आहे त्याला चन्द्रही पिवळा दिसतो तसे आहे. किंवा दारुड्यांना लोण्याची चव नसते तसे आहे !
--------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा