मंगळवार, ३० मार्च, २०१०

तुकारामाच्या गजला

इ-तुका
तुकारामाच्या गजला:
तुकाराम महाराज गजल लिहीत असतील असं कोणी स्वप्नातसुद्धा कल्पना करणार नाही. मोंगल साम्राज्याचा शेवटचा बादशहा बहादुर शहा जफर हा जसा साम्राज्य ब्रिटिशांना हवाली करण्यासाठी प्रसिद्ध होता त्यापेक्षा कितीतरी पटींनी ज्यास्त त्याची प्रसिद्धि आहे गजलांसाठी. त्याची एक गजल पहा उदाहरणादाखल:
कहीं मैं गुंचा हूं, वाशुद से अपने खुद परीशां हूं
कहीं गौहर हूं, अपनी मौज में मैं आप गलता हूं

कहीं मै सागरे गुल हूं, कहीं मैं शीशा-ए-मुल हूं
कहीं मैं शोरे-कुलकुल हूं, कहीं मैं शोरे-मस्तां हूं

कहीं मैं जोशे-वहशत हूं, कहीं मैं महवे-हैरत हूं
कहीं मैं आबे-रहमत हूं, कहीं मैं दागे-असियां हूं

कहीं मैं बर्के-खिरमन हूं, कहीं मैं अब्रे-गुलशन हूं
कहीं मैं अश्के-दामन हूं, कहीं मैं चश्मे-गिरियां हूं

कहीं मैं अक्ले-आरा हूं, कहीं मजनूने-रुसवा हूं
कहीं मैं पीरे-दाना हूं, कहीं मैं तिफ्ले-नादां हूं

कहीं मैं दस्ते-कातिल हूं, कहीं मैं हलके-बिस्मिल हूं
कहीं जहरे-हलाहल हूं, कहीं मैं आबे-हैवां हूं

कहीं मैं सर्वे-मौजूं हूं, कहीं मैं बैदे-मजनूं हूं
कहीं गुल हूं ’जफर’ मैं, और कहीं खारे-बयाबा हूं

आता हाच अंदाज जपत ’कहीं ’ ऐवजी मराटीत ’कैं’ वापरत तुकाराम महाराजांची ही गजल पहा:
कैं वाहावे जीवन । कैं पलंगी शयन ॥
जैसी जैसी वेळ पडे । तैसे तैसे होणे घडे ॥
कैं भोज्य नानापरी । कैं कोरडया भाकरी ॥
कैं बसावे वाहनी । कैं पायीं अनवाणी ॥
कैं उत्तम प्रावर्णे । कैं वसने ती जीर्णे ॥
कैं सकळ संपत्ती । कैं भोगणे विपत्ती ॥
कैं सज्जनाशी संग । कैं दुर्जनाशी योग ॥
तुका म्हणे जाण । सुख दु:ख तें समान ॥
इथे आपल्याला फक्त रचनेचे साधर्म्य आणि कही व कैं हे सारखे शब्द एवढेच जाणवत नाही तर आशयात सुद्धा जो सारखेपणा आहे त्याचे आश्चर्य वाटते. तुकाराम महाराज जसे कधी सुख तर कधी दु:ख असे म्हणतात तसेच जफर म्हणतात, कधी कृपेची वर्षा ( आबे-रहमत ) आहे तर कधी पापाचा कलंक ( दागे-असियां ).तुकाराम महाराजांचा "सज्जनाशी संग" हाच जफरचा "शोरे-कुलकुल" आहे तर "दुर्जनाशी योग" हा " शोरे-मस्तां " ( वेडयांचा गदारोळ)
आहे. जफरच्या गजलेत कधी काय आहे तर कधी काय आहे याचे वर्णन आहे तर त्यापुढे जाऊन तुकाराम महाराज म्हणतात की कधी सुख आहे तर कधी दु:ख आहे व ते तुम्ही समान जाणा, माना.

४ टिप्पण्या: