मंगळवार, १० ऑगस्ट, २०१०

तुकयाची ग्वाही 4

तुक्याची ग्वाही-४
"आपुल्या हिता जो होय जागता । धन्य मातापिता तयाचिया ॥" ( ९,जोग प्रत)
पहिल्यांदा आपल्याला वाटते की तुकाराम महाराज असे कसे एखाद्या स्वार्थी मुलाबद्दल इतके चांगले लिहीत आहेत. पण तुकाराम महाराज हे फार रोकडे उपदेश देणारे संत आहेत. आता पहा की एखादा मुलगा आपले हित जपत नोकरीतून बचत करीत, कर्ज काढून फ्लॅट घेतो, तेव्हा प्रथम आपल्याला वाटते की हा स्वार्थी आहे. पण नंतर त्या घरात थकलेल्या आईबापांचीच सोय होते हे कळते. निदान त्याचा तो स्वत: फ्लॅट घेतोय, आई-बापांवर ओझे बनत नाही आहे हेही हिताचेच आहे हे कळते. आणि असे मातापिता धन्यच होणार. मुले चांगले निघणे, कर्तबगार निघणे, त्यांनी स्वता:ची प्रगती करणे ह्या बाबी आईबापांना अतिशय सुख देणार्‍या म्हणूनच वाटतात. आज आपण पाहतोच की आपल्याकडे जवळ जवळ घरटी एक तरी मुलगा अमेरिकेस वा परदेशी नोकरीस असतो. अशा वेळी नुसत्या त्याच्याच आईबापांना नव्हे तर संपूर्ण देशालाच अभिमान वाटू लागतो. फक्त तुकाराम महाराजांच्या उपदेशा प्रमाणे आपण आपले हित जपायला हवे व त्यासाठी आपले चित्तच ग्वाही असते.


अरूण अनंत भालेराव
भ्र:९३२४६८२७९२ ( arunbhalerao67@gmail.com)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा