रविवार, १५ जुलै, २०१८


तुकाराम टाइम्स
------------------------
तुकारामाचा आजचा आग्रह-लेख --- १२    


तुकाराम महाराज आज जर एखाद्या वर्तमानपत्राचे संपादक असते तर आज जी मुख्य बातमी आहे त्यावर काय म्हणाले असते ?
१२  -------- मुलाने सांभाळ नाही केला तर दिलेले घर मातापिता परत घेऊ शकतात असा हायकोर्टाचा निर्णय
------------
लेकरा आइतें पित्याची जतन । दावी निजधन सर्व जोडी ॥1॥
 त्यापरि आमचा जालासे सांभाळ । देखिला चि काळ नाहीं आड ॥ध्रु.॥
 भुकेचे संनिध वसे स्तनपान । उपायाची भिन्न चिंता नाहीं ॥2॥
 आळवूनि तुका उभा पैलथडी । घातली या उडी पांडुरंगें ॥3॥
--------------------- 
( लहान लेकराला मातापित्यांचे आयते संरक्षण मिळते. पित्याने जे द्रव्य व गृहवस्त्रादिक मिळवून ठेविले असते, ते तो सर्व आपल्या मुलाला त्याच्या मोठेपणी दाखवितो, त्याच्या स्वाधीन करतो. त्याप्रमाणे अहो देवा,तुम्हाकडून आमचा प्रतिपाळ झाला आहे. आम्ही काळाला पाहिलेच नाही. बालकाला भूक लागल्याबरोबर जर स्तनपानाचा योग जवळच असेल तर पोट भरण्याकरिता निराळा उपाय करण्याची काही गरज नाही. तुकाराम महाराज म्हणतात, मी अशा प्रकारे पांडुरंगाला आळवून पलीकडील तीरावर उभा राहिलो. ते पाहून मला आश्रय द्यायला पांडुरंगाने उडी टाकली.---जोग प्रत )
--------------    

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा