रविवार, १५ जुलै, २०१८


तुकाराम टाइम्स
------------------------
तुकारामाचा आजचा आग्रह-लेख --- ११    


तुकाराम महाराज आज जर एखाद्या वर्तमानपत्राचे संपादक असते तर आज जी मुख्य बातमी आहे त्यावर काय म्हणाले असते ?
११ -------- उरले फक्त ३०० खड्डे , वाटा बुझल्या !
---------------

ओस जाल्या दिशा मज भिंगुळवाणें । जीवलग नेणें मज कोणी ॥1॥
 भय वाटे देखें श्वापदांचे भार । नव्हे मज धीर पांडुरंगा॥ध्रु.॥
 अंधकारापुढे न चलवे वाट । लागतील खुंटे कांटे अंगा ॥2॥
 एकला निःसंग फांकती मारग । होतों नव्हे लाग चालावया ॥3॥
 तुका ह्मणे वाट दावूनि सद्ग‍ुरू  । राहि हा दुरू पांडुरंग ॥4॥
( हे देवा, ह्या संसाररूपी अरण्यात तुजवाचून मला सर्व दिशा उजाड झाल्या आहेत, त्या मला भयंकर दिसतात आणि त्या ठिकाणी मला कोणी सखा आहे असे दिसत नाही. हे पांडुरंगा, अशा अरण्यामध्ये अनेक श्वापदांचा थाट ( कामक्रोधरूपी पशूंचा समुदाय ) पाहून मला भय वाटते, त्यामुळे मला धीर निघत नाही. पुढे मोठा ( अज्ञानरूपी ) अंधार पडल्यामुळे मला वाट चालवत नाही व माझ्या अंगास कांटे व खुंट ओरबाडतात. ह्या आडरानामध्ये अनेक मत-मतांतराच्या वाटा फुटल्या आहेत, तेथे मला कोणी सोबती नसून मी एकटा असल्यामुळे भय वाटून पुढे चालण्यास रिघाव होत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, माझा सद्गुरू पांडुरंग ह्याने मला पहिल्याने जीव-ब्रह्मैक्याची व  नामभक्तीची वाट दाखविली, पण आता तो दूर राहिला आहे.---जोग प्रत )
--------------- 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा