मंगळवार, १७ जुलै, २०१८


तुकाराम टाइम्स
------------------------
तुकारामाचा आजचा आग्रह-लेख --- १४      
----------------
तुकाराम महाराज आज जर एखाद्या वर्तमानपत्राचे संपादक असते तर आज जी मुख्य बातमी आहे त्यावर काय म्हणाले असते ?
१४ -------- शेती अगोदर माणूस भाकरी करायला शिकला म्हणे !
-------------
हरि गोपाळांसवें सकळां । भेटे गळ्या गळा मेळवूनी ॥१॥

भाविकें त्यांची आवडी मोठी । सांगे गोष्टी जीविंचिया ॥ध्रु.॥

योगियांच्या ध्याना न नये । भाकरी त्यांच्या मागोनि खाये ॥२॥

तुका म्हणे असे शाहाणियां दुरी । बोबडियां दास कामारी ॥३॥
--------------- 
इतिहास संशोधकांना म्हणे असे एक ठिकाण गवसले आहे की जिथे माणसाला शेती करण्याअगोदर भाकरी ( ब्रेड ) भाजणे जमले होते. ह्यावरून मानव जातीला भाकरीचे किती प्राधान्य होते हेच समजते. ह्यावर तुकाराम महाराजांनी माणसाने ज्याला देव ( हरि ) कल्पिले त्याच्याबद्दल एक मजेशीर विशेष टिपले आहे. तुकाराम महाराज इथे म्हणतात, हरि सर्व गोपाळांना गळ्यास गळा लावून भेटतो. जो मनोभावे त्याला भेटतो, त्याला तो आपले मनातले गुपितही सांगतो. जो एरव्ही मोठमोठ्या योग्यांनी तप केले तर त्यांच्या ध्यानातही येत नाही, तो हरि गोपाळांच्या भाकरी सलगीने मागून खातो. अगदी फुशारकी मारणाऱ्या “शहाण्या”पासून हरि दूर राहतो, पण भाव-भक्तीने मानणाऱ्या बोबड्या माणसाला हाका मारीत त्याच्याजवळ दास होऊन राहतो. जिथे देवच भाविकाकडे भाकरी मागत आहे तिथे तो शेती आधी भाकरी करायला/भाजायला  शिकला तर नवल नाही !
----------------------  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा